बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

प्लास्टिक बंदीचे करू स्वागत..

प्लास्टिक कचरा रोखायचा कसा? या विषयावर मी मांडलेले माझे विचार महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले..या विचारास आपण सर्व गुरुवर्यांनी मनापासून दाद दिलीत त्याबद्दल सर्वांचे *मनस्वी धन्यवाद!* प्लास्टिक मुक्ती संदर्भात गेल्या 4 वर्षापासूनच मी आमच्या गावातील आम्ही स्थापन केलेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्याचा प्रयास करत आहे. या माध्यमातून आम्ही व मी स्वतः आजपर्यंत गावात व विविध ठिकाणी जवळपास 1000 हुन अधिक कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. *समाज सहभागातून शिक्षण व समाजसेवा* हे ब्रीद घेऊन आम्ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात खारीचा वाटा म्हणून सेवेचे कार्य करत आहोत. आपण आपल्या भावी पिढीच्या भविष्याचा विचार करून एकमेव जीवसृष्टी असणाऱ्या या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वच घटकांवर मात करण्याचा प्रयास करूयात. प्लास्टिकबंदीचे मनापासून स्वागत करून पर्यावरणास घातक गोष्टी टाळूया..सुरुवात स्वतःपासून करू. 🙏 --✍ सुनिल अस्वले.(सुवर्णविलास) ,पदवीधर अध्यापक-केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा