रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

[7/17, 10:48 AM] सुवर्णविलास: मर्यादित ज्ञानावर आधारित परीक्षेतील यश - अपयश हे आयुष्यच्या गुणवत्तेचे मोजमाप असू शकत नाही...हे ज्याला उमगले तो खरा प्रज्ञावंत... 

ज्ञान हे समुद्रकिनाऱ्याच्या वाळूसारखे आहे.जोपर्यंत तुमचे पाय ओले असतील तोपर्यंत ही वाळू तुमच्या पायांना चिकटलेली असेल.. तुमचे पाय कोरडे होतील तेव्हा वाळू निसटून पडलेली असेल...ध्येय निश्चित करून सातत्याने जिद्द,चिकाटी ,मेहनत रुपी ओलाव्याने आपले पाय ओले ठेवा....
[7/17, 10:53 AM] सुवर्णविलास: *सुवर्णविचार*
*मर्यादित ज्ञानावर आधारित परीक्षेतील यश - अपयश हे आयुष्याच्या गुणवत्तेचे मोजमाप असू शकत नाही...हे ज्याला उमगले तो खरा प्रज्ञावंत...* 

 *प्रज्ञावंत माणसेच आयुष्यात यशस्वी झालेली आहेत.*

✍🏻 *सुवर्णविलास*
www.suvarnvilas.blogspot.com

मनाचे सौंदर्य...

*सुवर्णविचार*
शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. तुम्ही दिसता कसे यापेक्षा तुम्ही आहात कसे हे महत्वाचे... बाह्य सौंदर्याला परिस्थिती सापेक्ष मुखवटे लावून तुम्ही समोरच्या व्यक्तीची काही काळ फसवणूक करू शकता पण *अंतरीचे धावे स्वभावे  बाहेरी,धरीता परी आवरेना ...* या उक्तीप्रमाणे माणसाचे मन त्याच्या व्यक्तिमत्वातून केव्हातरी डोकावतेच...यातून तुम्ही कसे आहात याची जाण समोरच्याला निश्चितपणे होते...इतरांविषयी मनात प्रेम,करुणा,जिव्हाळा,प्रामाणिकपणा अन आदर हे गुण ज्याला जपता येतात त्याचे आंतरिक सौदर्य सुर्याप्रमाणे उजळत राहते.मग कटकारस्थानाचा कोणताही ढग तुमच्या या सौदर्याला बाधा आणू शकत नाही.. मनात मळभ  ठेवून तुम्ही बाहेरून स्वतःला कितीही सिद्ध करू पाहत असाल तरी ते शक्य होत नाही.. कारण तुमच्या अंतर्मनाला जाणणारा शेवटी *तो* 👆🏻आहेच... 

✍🏻 *सुवर्णविलास* 16/08/2021
www.suvarnvilas.blogspot.com