🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
*सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
दि.30/11/2017
*नातेसंबंध (भाग 3)*
मानवी जीवनात नाती फार मोलाची असतात.जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत लाभलेल्या आयुष्यात अनेक नाती निर्माण होतात.यातील रक्तसंबंधातील नात्यांसोबतच बाहेरच्या घटकांशीही नातेसंबंध निर्माण होतात.या *सर्व स्तरातील नात्यांची जपणूक करता येणे हा आयुष्याचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे.आणि तोच खराखुरा जीवनानंद आहे.* माणूस जगतो ते केवळ स्वतःकरीता.भौतिक सुखाच्या दुनियेत तो स्वत:ला आयुष्यभर हरवून जातो नि सुखाच्या शोधार्थ आयुष्य गमावून बसतो.आयुष्याचे खरे सुख हे भौतिक गोष्टीत नसून ते माणसांत ,त्याच्याशी असलेल्या नात्याच्या ओलाव्यात असते.हा ओलावा,आपुलकी,यातील स्नेहभाव टिकवून तो दिवसांगणिक दृढ करता येणे हे यशस्वी नि आनंदी जीवनाचे खरे सूत्र आहे.
जन्मजात असणारी नाती व निरंतर अनेक प्रसंगातुन निर्माण होणारी नाती व या नात्यांतील भावभावना या मनाशी जोडलेल्या आसतात.मानवाच्या नात्यांमध्ये मन ही मोलाची कामगिरी बजावते.खरेतर नातेसंबंधाचा पाया मन हाच आहे. *जिथे निरपेक्ष,निस्वार्थी,आनंदी,प्रेमळ मन असते ते नाते भक्कम पायावर आधारित निरंतर राहते.*कोणतेही गैरसमज,अविश्वास या नात्यांना तडा जाऊ देत नाहीत.आजी-आजोबा-नातवंडे,आई-वडील-मुले,पती-पत्नी,मित्र-मैत्रिणी यांची नाती ही निरपेक्ष,निस्वार्थी,आनंदी,प्रेमळ नि परस्पर विश्वासाच्या भरभक्कम पायावर आधारलेली असतील तर नक्कीच जीवनाचे नंदनवन होते.पण जिथे याऊलट परिस्थिती असते तिथे जीवन क्लेशकारक होते. कोणाच्याही जीवनात आपल्यामुळे क्लेश होऊ नये याकरीता प्रत्येकाने काळजी घेतली तर प्रत्येक नाते,प्रत्येक जीवन मधुरमय होईल.याकरीता मने निकोप असली पाहिजेत. *आपल्या नात्यांवर दृढ विश्वास असायलाच हवा.* कधी-कधी नात्यांबद्दल मनाची द्विधा अवस्था होते. ब-याचवेळा नात्यांमधील दुरावे,गैरसमज हे इतरांच्या विचारांतुन होतात. अशावेळी प्रत्येकाने आपल्या अंतरमनाचे ऐकावे.तुमचे अंतरमन तुम्हांला योग्य दिशा नक्कीच देते.त्याची साद जरूर ऐका.
*शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*
sunilaswale80@gmail.com
*whatsapp* 9049211785
*mob* 8805835959,7219550629
🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा