रविवार, १९ डिसेंबर, २०२१

सहज सुचलेले काही...

सांगा कसं जगायचं...??

आज घड्याळात पूर्वीइतकाच वेळ आहे. पूर्वीप्रमाणेच दिवस-रात्रीचे मिळून 24 तास आहेत.पण तरीही वेळ पुरत नाही या कारणास्तव माणसाची धावपळ सुरू आहे.पूर्वी मात्र सगळं कसं निवांत असायचं.
आता इतकीच किंबहुना आतापेक्षा  जास्त कामं घरातील अनेकजण मिळून पार पाडत असत.आतासारख्या तंत्रज्ञान ,दळणवळण,यंत्रसामुग्री आशा कोणत्याही सोयी उपलब्ध नसताना सारं काही पार पडत होत.
पहाटेच्या वासुदेव वाणीने दिवस सुरू व्हायचा.सडा- सारवण,रांगोळी काढून,तुळशी वृंदावनाचे पूजन व्हायचे..देवदेवतांचे पूजन होऊन जेवणं केली जायची.भाकरी बांधून माणसं दिवसभर पोटापाण्याचे उद्योग करत असत.घरातील ज्येष्ठ मंडळींचे संस्कार घडत असत.भजन-किर्तन ,यात्रा-जत्रा होत होत्या,कुस्ती, तमाशा चे फड रंगत असायचे...हीच काही मोजकी मनोरंजनाची साधने माणसाच्या जीवनात होती.पै-पाहुण्यांच्या कडे येणं-जाणं, बरेच दिवस मुक्कामी राहणं असायचं.माणसांत सलोखा,प्रेम,माया ,आपुलकी ,विचारपूस असायची.घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावून शुभंकरोती म्हणली जायची..कुटुंबांच्या एकत्रित पंगती पडायच्या..परस्परांची सुखदुःखे समजून घेतली जायची..आणि या साऱ्यातून माणूस समाधानी आयुष्य जगत होता.. आता हे सारं बदलले आहे..माणूस एकाकी पडत चालला आहे.वेळ पुरत नाही असे तकलादू कारण पुढं करणारा माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम बनला आहे.मोबाईल, टी.व्ही यातील आभासी मनोरंजनात,तंत्रज्ञानात गुरफटून तो पुरता एकटा होत आहे.कायम असमाधानी वृत्तीतून भौतिक सुखाच्या मागे स्वतःला नित्य धाववत आहे.घराला घरपण उरले नाही.परमेश्वराच्या शोधातही तो बाहेरच्या,दूरवरच्या देवळांमधून गर्दी करत आहे. यात भक्तिपेक्षा भटकंती करण्याचाच उद्देश होत आहे. माणसांची घरे किंमती,दिखाऊ झाली पण घरातील माणसांना किंमत उरली नाही.कुटुंबे विभक्त होऊन वृद्धाश्रमांची,पाळणाघरांची संख्या वाढत चालली आहे.यातून संस्कार मंदिरे नष्ट झाली आहेत. आपण जगतो कशासाठी आणि कुणासाठी हेच आता माणसाला कळेनासे झाले आहे.बाह्य झगमटाच्या कोशात स्वतःला गुरफटून घेतलेला माणूस कोशातच नष्ट होत चालला आहे.अपेक्षांच्या,तुलनेच्या तणावाखाली कोशातून फुलपाखरू बनून स्वच्छंदि आयुष्य जगणे तो पुरता विसरला आहे.
वेळच पुरत नाही ,खूप दगदग होते,त्रास होतो या भावनेतून समाधानाच्या आभासी दुनियेत जगणारी माणसे पाहिली की कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ,'सांगा कसं जगायचं,कण्हत कण्हत की गाणं म्हणत' या ओळी आपसूकच आठवतात.

✍🏻सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

सुवर्णविचार

*"मीच सर्वश्रेष्ठ अन माझं तेच खरं"*, हीच अहंकाराची भावना माणसाला सर्वाधिक थकवते.
✍🏻 सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

सुवर्णविचार

*"मीच सर्वश्रेष्ठ अन माझं तेच खरं"*, हीच अहंकाराची भावना माणसाला सर्वाधिक थकवते.
✍🏻 सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

[7/17, 10:48 AM] सुवर्णविलास: मर्यादित ज्ञानावर आधारित परीक्षेतील यश - अपयश हे आयुष्यच्या गुणवत्तेचे मोजमाप असू शकत नाही...हे ज्याला उमगले तो खरा प्रज्ञावंत... 

ज्ञान हे समुद्रकिनाऱ्याच्या वाळूसारखे आहे.जोपर्यंत तुमचे पाय ओले असतील तोपर्यंत ही वाळू तुमच्या पायांना चिकटलेली असेल.. तुमचे पाय कोरडे होतील तेव्हा वाळू निसटून पडलेली असेल...ध्येय निश्चित करून सातत्याने जिद्द,चिकाटी ,मेहनत रुपी ओलाव्याने आपले पाय ओले ठेवा....
[7/17, 10:53 AM] सुवर्णविलास: *सुवर्णविचार*
*मर्यादित ज्ञानावर आधारित परीक्षेतील यश - अपयश हे आयुष्याच्या गुणवत्तेचे मोजमाप असू शकत नाही...हे ज्याला उमगले तो खरा प्रज्ञावंत...* 

 *प्रज्ञावंत माणसेच आयुष्यात यशस्वी झालेली आहेत.*

✍🏻 *सुवर्णविलास*
www.suvarnvilas.blogspot.com

मनाचे सौंदर्य...

*सुवर्णविचार*
शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. तुम्ही दिसता कसे यापेक्षा तुम्ही आहात कसे हे महत्वाचे... बाह्य सौंदर्याला परिस्थिती सापेक्ष मुखवटे लावून तुम्ही समोरच्या व्यक्तीची काही काळ फसवणूक करू शकता पण *अंतरीचे धावे स्वभावे  बाहेरी,धरीता परी आवरेना ...* या उक्तीप्रमाणे माणसाचे मन त्याच्या व्यक्तिमत्वातून केव्हातरी डोकावतेच...यातून तुम्ही कसे आहात याची जाण समोरच्याला निश्चितपणे होते...इतरांविषयी मनात प्रेम,करुणा,जिव्हाळा,प्रामाणिकपणा अन आदर हे गुण ज्याला जपता येतात त्याचे आंतरिक सौदर्य सुर्याप्रमाणे उजळत राहते.मग कटकारस्थानाचा कोणताही ढग तुमच्या या सौदर्याला बाधा आणू शकत नाही.. मनात मळभ  ठेवून तुम्ही बाहेरून स्वतःला कितीही सिद्ध करू पाहत असाल तरी ते शक्य होत नाही.. कारण तुमच्या अंतर्मनाला जाणणारा शेवटी *तो* 👆🏻आहेच... 

✍🏻 *सुवर्णविलास* 16/08/2021
www.suvarnvilas.blogspot.com

रविवार, ११ जुलै, २०२१

सुवर्णविचार

*सुवर्णविचार*

आत्मिक समाधान मिळणे हा कार्याचा उद्देश असेल तर  केलेल्या अशा कार्यातून निश्चितच आत्मोन्नती घडते.

✍🏻©सुवर्णविलास 11/07/21
www.suvarnvilas.blogspot.com

शुक्रवार, १८ जून, २०२१

सुवर्णविचार

*सुवर्णविचार*

ज्या व्यक्तीला आपल्या सभोवती केवळ स्तुतीपाठकांची  गर्दी हवी असते त्या व्यक्तीला स्वतःतील उणिवा कधीच जाणवत नाहीत.अन यामुळे त्या व्यक्तीची कधीच उन्नती होत नाही. सभोवती स्वतःच्या स्वार्थी,मतलबी हेतूने पोकळ स्तुती करणाऱ्यांची गर्दी काही काळापुरते तुम्हांला आनंदी बनवू शकतो पण चिरकाल टिकणारा आनंद मिळवून देऊ शकत नाही. स्तुतीपाठकांच्या गर्दीत स्वतःला हरवणारी व्यक्ती आयुष्यात खऱ्या माणसांना गमावते.  क्षणिक प्रसिद्धी,स्तुती यांना हापापलेल्या माणसांना अशी खरीखुरी माणसं ओळखता येणं देखील दुरापास्तच... आणि जरी ओळखली तरी ती त्यांना नकोच असतात. स्वतःची स्तुती ,प्रसिद्धी या मोहपशात गुंतलेले असे लोक सभोवतालच्या स्वार्थी,मतलबी स्तुतीपाठकांनी आखलेल्या अधोगतीकडे जाणाऱ्या  रस्त्यावरून अंध अन बहिरे होऊन मार्गक्रमण करतात.अशा रस्त्याला परतीच्या वाटा नसतात.

✍🏻© सुवर्णविलास