🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
*सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
*दि.20/12/17*
*मन वढाय वढाय,उभ्या पिकातलं ढोर*
*किती हाकलं हाकलं,फिरि येतं पिकांवर|*
बहीणाबाईंच्या या काव्यपंक्तित मानवी मनाचे यथार्थ दर्शन घडते.अनेकदा आपण अनेक गोष्टी टाळण्याचा संकल्प
करतो.पण मनाने हे करणे त्रासदायक किंवा अशक्यप्राय होते.कितीदाही ठरवले तरी मन या गोष्टीस तयार होत नाही.मनापासून जोडलेल्या नात्यांच्या बाबतीत हा अनुभव निश्चितच येतो.काहीवेळा अनिश्चित,अपूरक तर काहीवेळा निव्वळ गैरसमजाच्या अव्यवहार्य कारणांतून अशा नात्यांपासून दूर होण्याचे मन ब-याचदा ठरवते.
पण शेवटी आपुलकी,स्नेह,जिव्हाळा,प्रेम,विश्वास या भावनांच्या वलयात गुंतलेले हे मन या नात्यांपासून दुरावण्यास मज्जाव करते. *नात्यांतील ओढ मनापासून जपली की नात्यांत दुरावा होणे शक्यच नसते.*मनापासून जोडली गेलेली मित्रत्त्वाची नाती आयुष्यात एकदाच निर्माण होतात.ती टाळून जगणे म्हणजे दिव्याने वातीशिवाय प्रकाश देणे असल्यासारखे आहे.प्रकाशाशिवाय सूर्य,पाण्याशिवाय समुद्र,ममतेशिवाय मातृत्व जसे अशक्य तसे भावनेशिवाय मन नि नात्यांशिवाय आयुष्य अशक्य. ही *नाती मनापासून जपली तरच आयुष्य आयुष्य असते* नाती जपणा-या अशा मनास नात्यांपासून कितीही हाकलं तरी त्यांन फिरून ,परतुन नात्याजवळ यावे ,नाते जपावे हेच खरे मन नि हेच खरे जीवन!
*शुभरात्री*
✍-- *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*
sunilaswale80@gmail.com
*whatsapp* 9049211785
*mob* 8805835959,7219550629
🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा