मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
   🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁🍃🍂🍁
                                                           दि.13/10/2017

गैरसमजाचे मळभ मनात ठेवून एखाद्याशी नाते मग ते कोणतेही असू दे, ते जपणे सर्वार्था चुकीचे असते.ज्याच्याशी आपले नाते प्रामाणिकपणाचे असते त्याने मनात आपल्याचविषयी संशय ठेवणे आणि तरीही आपण स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत,माणुसकीवर श्रद्धा ठेवत नाती सांभाळण्याचा कसोशीने प्रयास करावा हा प्रकार म्हणजे आत्मघात करण्यासारखाच आहे. *व.पु. नी म्हटल्याप्रमाणे आयुष्यातील सर्वात जीवघेणा क्षण कोणता तर तो हा की, खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा,सद्हेतुची शंका घेतली जावी,हा!*
       कोणतीही नाती निरखून - पारखून जोडणं शहाणपणाचं ठरतं. घाईगडबडीत भावनिक होऊन जोडलेल्या नात्यातील सुरवातीला असलेले ऋणानुबंध सतत नि अखेरपर्यंत तसेच राहतील याची शाश्वती नसते.आणि हे असे नाही झाले तर
होणा-या यातना शब्दांत व्यक्त करणे शक्य नसते.ही बाब मनात कँन्सरसारखी राहते.भावनिक मनाला ती अखेरच्या क्षणापर्यंत पोखरते.
*नाती जोडा-नाती जपा!*
            
            *शुभदिन*

✍ *सुवर्णविलास*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा