मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

माणसे

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                                       दि.18/11/2017

जीवनात अनेकदा अशी माणसे भेटतात की वेळ बदलेल तशी ही माणसे स्वतःला बदलत राहतात.स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणारी ही माणसे समोरच्या व्यक्तींचा अक्षरश: वापर करतात. समोरच्या व्यक्तीच्या भावभावनांशी यांना काही घेणे-देणे नसते.केवळ आपल्या विचारांप्रमाणे वागणे इतकेच यांना जमते.अशा माणसांशी  स्नेहसंबंध जोपासणे हे एक प्रकारचे दिव्यच असतं.कारण कोणत्या प्रसंगी ही कशी वागतील याचा काही नेम नसतो.यांना स्वतःचा मुड फार प्रिय असतो.यांचा स्वतःचा हा मुड कधी बदलेल याची शाश्वती नसते.ही माणसे एखाद्याशी स्नेहसंबंध जुळवतात पण यांचा मुड बदलला की हे हा स्नेहसंबंध सोयीस्कर दुर्लक्षित करतात अथवा विसरतातही. मैत्री मध्ये हा अनुभव अनेकदा अनेकांच्या अनुभवाला येतो.तुम्ही कितीही मनापासून अशा लोकांशी मैत्री केली असली तरी यांच्यादृष्टिने ही एक वेळ घालवण्यासाठी केलेली सोय असते.यांना मैत्रीची खरी जाणच नसते.खरेतर एखाद्याशी झालेली मैत्री म्हणजे जीवनतील अनेक सुखद क्षणातील एक दुर्मिळ क्षण असतो. या क्षणाला आयुष्यभर जपायचे असते.परस्पर विश्वास,स्नेह,निस्वार्थ प्रेम या गोष्टींनी मैत्री परिपूर्ण होत असते.आप्तनात्यासोबत मित्र ही एक हक्काची भावना असते.सुख-दुःख प्रसंगात मित्र ही व्यक्त होण्याची नि:संशय जागा असते.पण हे सर्व नाते विश्वासाच्या भक्कम पायावर आधारलेलं असते. पण अशा काही माणसांना या भावनेची,नात्याची कदर असत नाही. ही माणसे  समोरच्या स्नेह जोपासणा-या व्यक्तीला फारशी किंमत देत नाही.आपल्याच विश्वात मश्गुल असणारी ही माणसे तारे मोजण्याच्या नादात चंद्र गमावून बसतात.

              *शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा